राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील जनतेचे मानले आभार…

ठाणे : प्रफुल्ल शेवाळे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील जनतेचे मानले आभार…

तमाम महाराष्ट्रवासियांचे मनापासून आभार..!

लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारराजा आणि विशेषत: राज्याला सक्षम नेतृत्व प्रदान करण्याकरिता मोठ्या संख्येनं व जबाबदारीनं मतदान करणाऱ्या युवा वर्गाला मी हृदयपूर्वक धन्यवाद देतो.

याचबरोबर सुज्ञ बारामतीकरांच्या प्रचंड मोठ्या सहभागानं आणि सहकार्यानं आजची मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, याबद्दल मी बारामतीकरांचे सुद्धा मनापासून आभार मानतो.

त्याचप्रमाणे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान तसंच मतदान केंद्रावरील विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत फार मोलाची ठरली, याबद्दल सर्वांना विशेष धन्यवाद देतो.

लोकशाहीचा विजय असो..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!